दर्पण सह्याद्री न्यूज

प्रा.बाळासाहेब बोराडे

श्रीक्षेत्र राजूर: सामाजिक वनिकरण विभाग शासकीय योजनेचे अनुदान जाणीवपूर्वक कमी प्रमाणात देत असून त्या संदर्भात सखोल चौकशी करण्याची मागणी भोकरदन तालुक्यातील लोणगाव येथील शेतकरी संतोष झिने यांनी वनीकरण विभागाकडे निवेदणाद्वारे केली आहे.सामाजिक वनिकरण विभाग शासकीय योजनेचे अनुदान कमी देत असल्याचा आरोपही शेतकऱ्याने केला आहे.संतोष झिने यांनी वनविभाग अधिकाऱ्यास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की माझी लोणगाव शिवारात गट क्र. 245 मध्ये सामाजिक वनीकरण विभागामार्फत झाडांची लागवड केली आहे.वृक्ष लागवडीचे हे तिसरे वर्ष असून माझ्या शेतातील 80 ते 90 टक्के झाडे जिवंत आहेत.तसेच झाडांची योग्य प्रमाणात वाढ झालेली आहे.     वृक्ष लागवड शासकीय योजनेनुसार मला शासनाकडून 5 लाख 67 हजार रुपये एवढी रक्कम मिळणे अपेक्षित होते. परंतु असे असताना देखील वनविभागाकडून फक्त 3 लाख 81 हजार एवढीच रक्कम मला मिळाली आहे.1 लाख 85 रुपये बाकी असल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे.यासंदर्भात शेतकरी संतोष झिने यांनी संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करून मला उर्वरित रक्कम मिळावी अशी मागणी केली आहे. त्यासाठी भोकरदन येथील वनविभाग अधिकाऱ्यांना लेखी निवेदनही देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!